Thursday, January 16, 2014

मनमाड ५० वर्षांपूर्वीचे

मनमाड ५० वर्षांपूर्वीचे
कोळशाच्या धुराच्या झेन्ड्यानी धुरकट लेले
रेल्वे इंजीनानांच्या शिट्ट्यात दुमदुम लेले
स्टेशनच्या कडेने बिलगलेलं माझं गाव मनमाड

जेव्हा पहिल्या पावसात न्हाऊन भिजून जातात
सरळ धावणाऱ्या अरुंद पण प्रामाणिक वाटा
भल्या माणसांचा सहवास नांदत असतो त्यांच्या काठा

रामगुळणेचे पाणी खळाळत गाते गोड गाणी
दूरवर शांततेला साद देत असते एक घंटा राणी
तर आनंद शिंपडीत जाते वाऱ्याची अत्तरदाणी

नागापूरचा महादेव आठवतो दर श्रावणी सोमवारी
शिंगव्याचा छोटा डोंगर बोलावतो जत्रेच्या गुरुवारी
अणकाइचा किल्ला आव्हानं देत राहतो रविवारी
तर बगलेतला रेल्वे बंधारा हजर रोज सायंकाळी

दत्त मन्दिरामागच माझं क्रिकेटच विस्तीर्ण मैदान
प्रत्येक दगडाखाली असते विंचवाच्या बिर्हाडाच ठाण
तरीही हरवते घोंघावत्या वाऱ्यात प्रेमी युगलांच भान
केलंय किती हो खेळताना आम्ही बालमित्रांनी जीवाचं रान

अठरा पगड जातींच्या वस्तीत घर माझं "मंगलधाम"
येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला मिळायचा मोठा विश्राम
श्वान,गाय, पोपट, मुंगुस, मांजर, वानर यांनाही ते आधार
आजही दरवळतो तेथे घालून घेतलेल्या आदर्शांचा श्वास

आमच्या साऱ्यांच्या साथीला प्राणिमात्रांची ती साथ
नाही उणीव लौकिकाची जेथे मित्र निसर्गाचा वास
माझ्या जन्माची ती पहाट बाल्य सोडण्याची आस
वाढीत राहो माझ्या मनाचा हा माड मना एक ध्यास
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment